Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्तपेढी सुरु ठेवा २४ तास नाहीतर होणार कारवाई

Webdunia
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (08:22 IST)
राज्य रक्त संक्रमण परिषदे मोठा निर्णय घेतला आहे. रक्ताची गरज रुग्णांना दिवस-रात्र कधीही कोणालाही लागू शकते. या कारणामुळे रुग्णांना ज्यावेळी रक्त आवश्यक असेल त्याचवेळी जर रक्तपेढी बंद आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना ‘राज्य रक्त संक्रमण परिषदेने’दिल्यात. मुंबई उपनगरातील एका रुग्णालयातील पालिकेची रक्तपेढी रात्री बंद असल्याची तक्रार ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ला रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली होती, त्याच तक्रराची दखल घेत परिषदेकडून ही सूचना दिली गेली आहे. वांद्रे येथील ‘के.बी. भाभा’रुग्णालयातील रक्तपेढी बंद आहे याबबत तक्रार चेतन कोठारी यांनी ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’कडे केली, रक्तपेढी रात्री बंद असल्याने इतर खासगी रक्तपेढ्यांचे काम मात्र जोमात सुरु होते, असे समोर आले. ही गंभीर तक्रार परिषदेला मिळाली त्यामुळे परिषदेकडून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला गेला, त्यावर परिषदेने पालिकेकडून खुलासा मागवला आहे. सोबतच  ही रक्तपेढी परत रात्रीची बंद आढळली तर कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमची ही तक्रार असेल तर ती नक्की नोंदवा त्यामुळे कोणाचा तरी जोव नक्की वाचेल.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments