Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र आरोग्य विभागात मेगा भरती

Webdunia
रविवार, 9 एप्रिल 2023 (13:11 IST)
महाराष्ट्रात नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या साठी राज्य सरकारने आरोग्य विभागात भरती करण्याचा निर्णय घेतला असून या साठी घेतली जाणारी परीक्षा आणि निवड पद्धती वादात पडून त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लावण्यात आला. राज्य स्तरीय 'अवयवदान जन जागृती अभियान' चे उदघाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडले.

त्यावेळी बोलताना महाजन म्हणाले, सध्या लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी आहे.देशभरात राज्यात काही कारणास्तव अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अवयव वेळीच न मिळाल्यामुळे रुग्ण दगावतात. तसेच समाजात अजून देखील अवयवदान करण्याबाबत लोकांमध्ये काही गैरसमज आहे. त्यामुळे लोक अवयवदान करत नाही. त्यामुळे अवयवदान जन जागृती अभियान राबविले जात आहे. या साठी जनतेचे मोलाचे योगदान अपेक्षित आहे. या अंतर्गत येत्या काळात जिल्हा निवड समितीच्या मार्फत 4500 पदासाठी भरती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या वेळी जास्त प्रमाणात डॉक्टर व्हावे त्यासाठी ज्यादा मेडिकल कॉलेज उघडले जातील, औषधींसाठी मोठ्या फंडाची उभारणी  तसेच ग्रामीण भागात जाऊन अवयवदानाची जन जागृती करण्याचे त्यांनी सांगितले.येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल. या वेळी कार्यक्रमाला विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. अंबादास दानवे यांनी या वेळी आपले शरीर दान करण्याची  घोषणा केली .      
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments