Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : “वर्षभराची माझी मेहनत दहा मिनिटांमध्ये वाया गेली”; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…

Webdunia
सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (08:39 IST)
दुपारी तीन वाजेच्या सुमारास निफाड परिसरात बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट या तिहेरी माऱ्यामुळे द्राक्ष बागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निफाड येथील शेतकरी संजय भाऊ गोळे यांनी आपल्या द्राक्ष बागेची परिस्थिती कथन करताना सांगितले की, “वर्षभराची मेहनत माझी दहा मिनिटांमध्ये वाया गेली.

आमच्या घराचे संपूर्ण उत्पन्न हे फक्त द्राक्ष बागेवर आणि गहू कांदा या पिकांवर अवलंबून होते. मात्र जेमतेम दहा मिनिट झालेल्या गारपिटीमुळे आम्ही पूर्णपणे उध्वस्त झालो आहोत. जिंदगीत कधी पाहिले नव्हता एवढा मुसळधार पाऊस आणि दगडासारख्या गारा हे दृश्य हादरवून टाकणारे होते.”
 
आणि हे म्हणणे फक्त एकट्या संजय गोळे यांचे नसून परिसरातील सर्व शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदारांना हा फटका सहन करावा लागलेला आहे.
 
संपूर्ण द्राक्ष बागा उध्वस्त झालेल्या असून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने क्षणात हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे आता त्यांना बोलणे सुद्धा अशक्य होऊन बसलेले आहे. या गारपिटीबरोबर तब्बल तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेतांमध्ये पाणी साचले असून जेमतेम महिना भराची कोवळी असलेली गहू कांदा व हरभरा यांची रोपे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. टोमॅटो वांगे ऊस भाजीपाला या सुद्धा सर्व पिकांना प्रचंड फटका बसलेला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

पुढील लेख
Show comments