Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोकण रेल्वेच्या प्रवासी गाडय़ा 20 पासून विजेवर चालणार

Webdunia
गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (09:08 IST)
मडगाव कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी खुष खबर… कोकण रेल्वेतून होणारा प्रवास आता वेगवान होणार आहे. येत्या आठवडय़ापासून या मार्गावरील चार गाडय़ा यापुढे विजेवर चालणार आहेत. त्यानंतर हळूहळू या मार्गावरून सर्व गाडय़ा विजेवर धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.
 
सध्या पहिल्या टप्प्यात 20 सप्टेंबरपासून त्रिवेंद्रम पासून सुटणारी नेत्रावती एक्स्प्रेस विजेवर चालणार असून परतीची 22 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणारी नेत्रावती विजेवर धावणार आहे. 22 सप्टेंबर रोजी कोचुवेलीपासून सुटणारी कोचूवेली – एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी विजेवर धावणार असून 23 रोजी मुंबईहून सुटणारी परतीची गाडी विजेवर चालणार आहे.
 
दोन महिन्यांपूर्वी कोंकण रेल्वेच्या पूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाले होते. आतापर्यंत मालवाहू रेलगाडय़ाच विजेवर चालत होत्या. आत्ता प्रवासी गाडय़ा विजेवर चालणार आहे.
 
दरम्यान, कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या 741 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर टप्प्याटप्प्यात विजेवर चालणाऱया गाडय़ा धावू लागणार आहेत. सध्या मुंबई ते रत्नागिरी आणि कारवार ते बंगळुरु या मार्गावर विजेवर चालणाऱया रेल्वेच्या गाडय़ा सुरू झाल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला नोव्हेंबर 2015 मध्ये सुरुवात झाली होती. एकूण 6 टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात आले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments