Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीन गाड्यांचा तिहेरी अपघात, त्यातील एका कारने अचानक पेट घेतल्याने कारमधील महिला जळून राख

Webdunia
बीड येथील गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ स्कार्पिओ, कार आणि दुचाकी यामध्ये तिहेरी असा भीषण अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त कारने लगेच पेट घेतल्याने, आगीत एक महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. घटना कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर घडली आहे. 
 
सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्ह्यातील ज्ञानेश्वर जाधव आपल्या घरातील सर्वांसोबत कार क्रमांक एम. एच. १४ एम. एच. ८६३९ इंडिगोने पुण्याकडे निघाले होते. त्यांची गाडी गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे आली असता, या गाडीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओने जबर धडक दिली. याचवेळी अपघातग्रस्त दोन्ही गाडीला एका दुचाकीस्वार देखील येऊन धडकला होता. मात्र वाढलेले तपमान आणि झालेला जबर अपघात यामुळे जाधव यांच्या कारने लगेच पेट घेतला. 
 
यावेळी जवळ नागरिकांनी लगेच ज्ञानेश्वर जाधव, त्यांची मुलगी यांना बाहेर काढले. मात्र काही वेळात आगीने उग्र रूप धारण केल्याने गाडीत अडकून पडलेल्या मनिषा ज्ञानेश्वर जाधव (वय ३५) या होरपळून जळून गेल्‍या तर त्यांच्या सोबत असलेली मुलगी लावण्या वय ८ ही जबर भाजली आहे. तसेच ज्ञानेश्वर जाधव हेही भाजले आहेत. दोघा जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, अधिक तपास करत आहेत.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments