rashifal-2026

पुणे हादरले

Webdunia
शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (16:35 IST)
पुणे येथील सर्वात प्रसिद्ध असलेल्या भोसरी परिसरात राहत असलेल्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी व चार वर्षाच्या मुलासोबत आपलं आयुष्य संपवल आहे. हा खळबळजनक प्रकार आज उघड झाला आहे. पोलिसांच्या नुसार आयटी इंजिनिअरनं पत्नी, मुलाची हत्या केली मग त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणात आय टी इंजिनिअर जयेश कुमार पटेल (वय 34), भूमिका पटेल (वय 30 ) व अक्षय पटेल (वय 4) अशी मृतांची नावे आहेत. उच्च दर्जाच्या वसंत विहार सोसायटीमधील ही घटना समोर आली आहे. तीन जणांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते तर त्यांना दीड लाख रुपये महिना पगार होता. पुणे येथील एका नामांकित कंपनीत नोकरी करत. त्यांची पत्नी गृहिणी होती. मात्र दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद ठेवले होते. संशय आल्यानं शेजार्‍यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास याची माहिती दिली. यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बालकनीतून पोलीस पटेल यांच्या घराजवळ पोहोचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत आढळल आहे. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पटेल त्यांचा मुलगा रोगाने ग्रस्त होता त्यातून सुटका व्हावी म्हणून असे पाऊल त्यांनी उचलले असावे असा कयास आहे. अक्षयचा मृतदेह तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत होता तर जयेश व भूमिका दोघांच्याही गळ्याभोवती दोरीचे व्रण पोलिसांना प्राथमिक तपासातून आढळून आले. त्यातून पोलिसांनी मुलाचा व पत्नीचा खून करून जयेशने आत्महत्या केली असावी, किंवा दोघांनीही एक सोबत आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई : मालाड येथे फळांवर उंदीर मारण्याचे विष फवारल्याप्रकरणी पोलिसांनी विक्रेत्याला अटक केली

पनवेल-अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस सुरू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ चे उद्घाटन केले

महाराष्ट्रातील हवामानात बदल, काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटा तर काही भागात पावसाचा इशारा

पुढील लेख
Show comments