Festival Posters

पुढील तीन दिवस पावसाचे, ‘या’ जिल्ह्यांना दिला अलर्ट

Webdunia
गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:05 IST)
सध्या दिवसभर कडाका वाढला असून सायंकाळी गार हवा जाणवते आहे. अशातच आता २१ ते २३ एप्रिलपर्यंत जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. यातील 21 आणि २२ एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर (Kolhapur), पुणे, सोलापूर, उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur), नांदेड (nanded) या जिल्ह्यांमध्ये २१ आणि २२ तारखेला विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय बुलडाणा (Buldhana), वाशिम, अकोला (Akola), अमरावती, यवतमाळ (Yavatmal), वर्धा, चंद्रपूर, नागपूर (Nagpur), भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. २३ तारखेलाही यापैकी काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, २० आणि २१ एप्रिल रोजी राजस्थान (Rajsthan) आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. २१ आणि २२ रोजी पूर्व उत्तर प्रदेशात आणि आज १९ एप्रिल रोजी राजस्थानच्या वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार धूळ वाढवणारे वारे ताशी २५-३५ किमी वेगाने वाहण्याची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

रमाबाई आंबेडकर स्मृतिदिन : मायेची सावली रमाबाई भीमराव आंबेडकर

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

पुढील लेख
Show comments