Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन,ऑरेंज अलर्ट जारी

Webdunia
शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:01 IST)
गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.त्या मुळे नागरिकांना उकाड्यापासून चांगले वाटतं असून शेतकरी बांधवाना दिलासा मिळाला आहे.
 
तर हवामान खात्याने कोकणात आणि पश्चिमी महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसाची चातका प्रमाणेच शेतकरी बांधव देखील आतुरतेने वाट बघत होते.   
पावसाच्या आगमनानंतर रायगड जिल्ह्यात शेतीच्या कार्याला सुरुवात झाली आहे.पाणी चांगले आल्याने भाताच्या लागवडीच्या कामाला देखील वेग आला आहे.त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात आहे.
 
राज्यातील नासिक शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे आगमन झाल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे.पावसामुळे शहरातील काही भागात रस्त्यावर तुडुंब पाणी साचल्याने वाहतुकीत खोळंबा होत आहे. वाहतूक ठप्प झाली आहे.
 
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात पावसाचे दमदार आगमन झाले मुसळधार पावसामुळे फाल्गुनी नदीला पूर आला त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.नागपूर मध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी करून विनाकारण घरातून बाहेर पडण्यास नाही सांगितले आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments