Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपने जे पेरले तेच आता उगवले : राज ठाकरे

Webdunia
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता भाजप सरकारवर ‘शाब्दिक’ हल्ला चढवला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जे पेरले तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहे, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये भाजपकडून दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतरही पाळली नाहीत, याकडेही राज यांनी लक्ष वेधले. 
 
भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ती आश्वासने दिली. लोकांची मने भडकवण्यासाठी खोट्याचे खरे करून दाखवले. विरोध करणाऱ्यांना ट्रोल करून शिवीगाळ केली. त्यांचे खच्चीकरण केले, असेही ते म्हणाले. आश्वासने पूर्ण करणे सोडाच, पण सत्तेच्या मग्रुरीत निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला ‘जुमला’ होता, असे जाहीर केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments