Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भोंग्यांवरुन राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अतिशय खरमरीत पत्र

Webdunia
मंगळवार, 10 मे 2022 (21:13 IST)
भोंग्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिशय खरमरीत पत्र लिहीले आहे. विशेष म्हणजे, भोंग्यावरुन दुसऱ्यांदा राज यांनी उद्धव यांना पत्र लिहीले आहे. गेल्यावेळप्रमाणेच यंदाच्या पत्राची भाषा सुद्धा अतिशय खरमरीत आहे. त्यामुळे त्याची सध्या दोरदार चर्चा होत आहे.
 
मशिदींवरील भोंगे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार काढण्यात यावे अन्यथा ४ मे पासून मशिदींसमोर हनुमान चालिसा लावला जाईल, असे खुले आव्हान राज यांनी दिले होते. त्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक पोलिसांनी स्थानिक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिस बजावली. काहींची धरपकड केली तर काहींना अटक केली आहे. या सर्व प्रकाराची मोठी चीड राज यांना आलेली दिसते. त्यावरुनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना अतिशय कडक भाषेत पत्र लिहीले आहे. राज्य सरकार भोंग्यांवर कारवाई करायचे सोडून मनसैनिकांवर कारवाई करीत आहे, हे अयोग्य असल्याचे राज यांनी म्हटले आहे. तसेच, राज यांनी या पत्राद्वारे अतिशय गंभीर इशाराही दिला आहे. राज यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!, अशा शब्दात राज यांनी उद्धव यांना सुनावले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय

CSK vs DC: सीएसकेचा 25 धावांनी पराभव करत दिल्लीने तिसरा विजय नोंदवला

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : अशी घटना रोखण्यासाठी एसओपी तयार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंना पोटगी द्यावी लागेल, माझगाव सत्र न्यायालयाचा आदेश

नागपुरात रामनवमीसाठी वाहतूक पोलिसांनी जारी केली ऍडव्हायजरी, वाहतूक कुठे वळवणार ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments