Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुळा कालव्यातून सिंचनासाठी ६ जानेवारीपासून आवर्तन

Webdunia
मंगळवार, 4 जानेवारी 2022 (21:31 IST)
अहमदनगर जिल्हा ला वरदान असलेल्या मुळा डाव्या कालव्यातून सिंचनासाठी दिनांक ६ जानेवारी पासून आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली.
यावर्षी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच लाभक्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहीरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली होती.
त्यामुळे आजपर्यत आवर्तनाची आवश्यकता भासली नाही. परंतू आता विहीरींची पाणी पातळी कमी होऊ लागल्यामुळे डाव्या कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांकडून आवर्तनाची मागणी करण्यात येत होती.
परंतू यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नसल्यामुळे व या कमिटयांचे अध्यक्ष जिल्हयाचे पालकमंत्री असल्याने आर्वतन सोडण्याकरीता कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने
आयोजित करण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे केली होती.तसेच याबाबत त्यांच्याशी दि . ४ जानेवारी रोजी दूरध्वनीव्दारे चर्चाही केली होती.
त्यानुसार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुळा डाव्या कालव्याच्या आवर्तनास मंजूरी दिलेली असून हे आवर्तन दि .६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments