Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली, पीएमएलएचा निर्णय

Webdunia
बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:29 IST)
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी मिळून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांच्या घरात छापेमारी करून ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. संपूर्ण चौकशीअंती ईडीने त्यांना अटक केली. मात्र, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर होती, असा महत्त्वाचा निर्वाळा पीएमएलए कोर्टाने दिला. यावरून पीएमएलए कोर्टाने ईडीला झापलं आहे.
 
पीएमएलए कोर्टाने १२२ पानी आदेशपत्र जारी केले आहेत. संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर होती. या प्रकरणात ईडीने आपल्या मर्जीने आरोपी निवडले. राकेश आणि सारंग वाधवान हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अवैधरित्या पकडलं, असं पीएमएलए कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटले आहे. तसंच, संजय राऊत आरोपी आहेत, याचे पुरावे द्या असंही कोर्टाने ईडीला म्हटलं आहे.
 
दिवाणी खटले हे मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून आणि अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली असल्याची महत्त्वाची टिप्पणीही पीएमएलए कोर्टाने केली.

Edited by- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याला जाण्यापासून रोखले, मालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

बीड मशिदीत स्फोट प्रकरणी दोन्ही आरोपींवर UAPA लागू

मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

मुंबईत निरोप भाषणाच्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

पुढील लेख
Show comments