Festival Posters

सरकारने सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा टाकलाय - राष्ट्रवादीची टीका

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2019 (09:47 IST)
सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा टाकणाऱ्या फडणवीस सरकारने कर्ज काढण्याचा विक्रमच केलाय, अशी उपहासात्मक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत केली. तसेच फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना समान न्याय दिला जात नाही.एका मंत्र्यांला भरघोस निधी दिला जातो तर काहींना तुटपुंजा निधी दिला जातो, याकडे लक्षवेधीद्वारे शिंदे यांनी लक्ष वेधले.
 
विधानसभेत शशिकांत शिंदे यांनी सरकारला धारेवर धरताना सांगितले की, पुसेगाव-कोरेगावच्या एमआयडीसीचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. परंतू सरकार बदलले आणि या सरकारने तो निर्णय अडगळीत टाकला. याबाबत मंत्र्यांकडे पाठपुरावा केला तरी कारवाई होत नाही. त्यामुळे सरकारला एमआयडीसी करायची आहे की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
 
सरकारने अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली. पण प्रकल्प पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच कामगार खाते राहिले आहे की नाही, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. सरकार भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करते मात्र कालातंराने त्यांना कामावरही घेतले जाते. त्यामुळे कुठे तरी सरकार या लोकांना पाठिशी घालत आहे. कामगाराला वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. कामगाराला मोडीत काढण्याचे काम करू नका, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालाड येथे अघोरी पूजा आणि जादूटोणा केल्याप्रकरणी भोंडुबाबा रिदम पांचालच्या विरोधात गुन्हा दाखल

लग्नाच्या रात्री वधू चोरी करून पळून जायची; अविवाहित पुरुषांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी योजना: आता महाराष्ट्रात कांदा पावडरचे उत्पादन होणार

नांदेडमध्ये नाल्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

लखनौमध्ये भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटांनी २०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments