Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर – फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:10 IST)
राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.राज्यात इतकी प्रचंड दलाली सुरू आहे… खरं म्हणजे ही दलाली इतक्या स्तरावर पोहोचली आहे की, काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे असं आयटीच्या छापेमारीत लक्षात येत आहे. हे महाराष्ट्रात सुरू असेल तर ईडी, सीबीआय राज्यात येणारच. जनतेशी बेईमानी करुन सत्तेत देवेंद्र फडणवीसांनी पुढे म्हटलं, मुख्यमंत्रिपदी असल्याने ठाकरे विसरले, जनतेने भाजपला नाकारलं नाही.
 
जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले. जनतेशी बेईमानी करुन तुम्ही सत्तेत आलात. जनतेशी बेईमानी करत शिवसेना, ठाकरे सत्तेत आहे. मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होत, मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा लपून राहिलेली नाही.
 
मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा पूर्ण झाली आम्हाला दोष देऊ नका. एकूणच कालच्या मेळाव्यात ना विचार होतं, ना सोनं होतं. कालच्या मेळाव्यात केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्टेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतं. असंगाशी संग केला तर अशाच प्रकारचं फ्रस्टेशन होईल आणि शाच प्रकारचं वक्तव्य निघेल. मी केवळ इतकंच सांगतो भाजपला नामोहरण करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही सत्ता वापरील, पैसा वापरली तरी देखील नंबर एकचा पक्ष भाजपच होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सीजच्या विरोधात ईडी, सीबीआय याचं भय कुणाला असेल? ज्याने काही केलं असेल त्याला भय असेल. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एजन्सीजच्या वापराच्या विरोधात आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments