Marathi Biodata Maker

जनतेचा पैसा जाहिरातींवर खर्च करणाऱ्या सरकारची मानसिकता

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2018 (09:37 IST)

जनतेचा पैसा जाहिरातींवर खर्च करणाऱ्या सरकारची मानसिकता म्हणजे मोफत का चंदन, घिस मेरे लल्ला - सुनिल तटकरे

भाजप-सेनेच्या या सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी आमची मागणी आहेच, पण त्याच बरोबर मागच्या चार वर्षांपासून ज्या शेतकऱ्यांचे वीज बील थकित आहे, त्यांचेही वीज बिल माफ झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी बीड येथे केली. हल्लाबोल आंदोलनातील सभेत ते बोलत होते.

या सरकारची धोरणे अत्यंत फसवी आहेत. जनतेच्या पैशाचा अपव्यय या सरकारकडून केला जात आहे. 'मोफत का चंदन, घिस मेरे लल्ला' या म्हणीप्रमाणे भाजपचे हे निर्दयी सरकार लोकांच्या घामाच्या पैशाचा वापर स्वतःच्या जाहिरातीसाठी करत आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाला ज्याप्रकारे जोरदार पाठिंबा मिळत आहे, ते पाहता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता हे वारे वाहू लागले असल्याचा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  म्हणाले की बीड जिल्ह्यातून लाखो लोक रोजगारासाठी बाहेर जातात. हा प्रश्न गंभीर आहे. पण याबाबत प्रशासन आणि शासन काहीच का करत नाही? जिल्ह्याचे पालकमंत्री या संदर्भात काय करतात? हे सरकार जिल्ह्याचा विकास न करता वेगळ्याच विषयावर राजकारण करत आहे. पण आम्हाला माहीत आहे की बीड जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे. भाजपच्या फसव्या जाहिरातबाजीमुळे २०१४ च्या निवडणुकांत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली नाही. पण २०१९ च्या निवडणुकीत या नाकर्त्या सरकारविरोधात जिल्ह्याने राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

विधान परिषद विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे   म्हणाले की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वर्षभरात होत आहेत. 'हल्लाबोल'च्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की उरलेल्या काळात नीट काम करा, नाहीतर जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद असूनही विकासाच्या बाबतीत जिल्हा खूप मागे आहे. पण बीड शहराला संदीप क्षीरसागर यांच्या रूपाने लोकांसाठी रस्त्यावर उतरणारा युवानेता मिळाला आहे. बीडचा विकास साधण्यासाठी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना पुढे घेऊन पक्ष काम करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.                                   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments