Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही

Webdunia
बुधवार, 16 जानेवारी 2019 (09:47 IST)
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही. न्यायालयीन कामकाजाचा योग्य प्रकारे पाठपुरावा करण्यात येईल. त्याचबरोबर सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची बैठक लवकरच बोलावू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे, माजी ता. पं. सदस्य मारुती मरगाण्णाचे यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. 
 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. परंतु, याकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केल्याने मध्यवर्ती म. ए. समितीने आंदोलन छेडण्याचा इशारा नुकताच दिला होता. शनिवारी बेळगाव व कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या  खा. शरद पवार यांनी समिती शिष्टमंडळाला सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी भेट घेण्यात आली. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments