Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आझाद यांना डांबून ठेवणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळपेची असल्याची टीका - जितेंद्र आव्हाड

Webdunia
सोमवार, 31 डिसेंबर 2018 (11:11 IST)
भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची मुंबईत सभा रद्द झाली असून, सोबतच पोलिसांनी पुण्यालाही जाऊ देणार नाही हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखऱ आझाद यांना डांबून ठेवणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळपेची असल्याची टीका केली असून,  आव्हाड यांनी चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या हॉटेल मनालीमध्ये जाऊन त्याची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
मला वाटतं सरकारने त्याला डांबून ठेवून चूक केलीय, चैत्यभूमीला जाण्यापासून रोखणं हे चुकीचं असून, सरकार अशाप्रकारे विरोधकांचा आवाज दाबू शकणार  नाही. त्यामुळे आता सरकारला यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. लोकशाहीची हत्या, विटंबना आहे. त्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असून ही त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे असे आव्हाड यांनी म्हंटले आहे. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांची २९ डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता सभा होणार होती. वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती.

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments