Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणी पाणी करणार पीक करपताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले मग हताश होऊन पपई पिकात रोटावेटर फिरविला

Webdunia
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (11:13 IST)
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील बोरी ईजारा येथील शेतकरी परशुराम गंगाराम डवरे यांच्याकडे 7 एकर शेती त्यात 4 एकर टरबूज आणि 2 एकर पपई 1 एकर वर अन्य पीक त्यांनी घेतले मात्र आताच्या भारनियमनचा त्यांच्या शेतातील पिकांना फटका बसला संपूर्ण शेतातील पिकांना या ऐन रखरखत्या उन्हाळ्यात पाणी योग्य प्रमाणात पिकांना पाणी देता येत नसल्याने पाणी पाणी करणार पपई पीक गळू लागलं करपू लागलं आणि त्यामुळे गतप्राण होणार झाड पाहून त्यांनी नाईलाजाने शेतात रोटावेटर चालविला

मागील वर्षी परशराम डवरे यांना याच शेतात पपईचे मोठं उत्पन्न घेत त्यातून नफाही मिळविला तो अनुभव पाहता त्यांनी मागील वर्षी एप्रिल महिन्यात ताईवान जातीच्या पपईची शेतात लागवड केली मात्र मागील वर्षी 24 तास मिळणारी वीज यंदा केवळ 8 तास मिळू लागली ती सुद्धा रात्री 1.30 वाजता त्यामुळे पिकाला फटका बसतोय अशात संपूर्ण 7 एकर मध्ये ओलित करणे कठीण झाले त्यामुळे त्यांनी अगतिक होऊन नाईलाजाने त्यांच्या पपईच्या बागेत त्यांनी रोटावेटर चालवुन पीक काढून टाकले आहे.
 
शेतकऱ्याला किमान 12 तास वीज मिळावी अशी अपेक्षा आहे मात्र अनियमित वीज पुरवठा यामुळे नाईलाजाने हे पीक जमीनदोस्त करावं लागलं असे परसराम डवरे यांनी म्हटले या भागातील शेतकऱ्यांना वेळेत वीज मिळावी असे या भागातील शेतकरी नेते म्हणत आहे तसे न झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरू अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी घेतली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

अजित पवार यांचा कंत्राटदारांवर कोणतेही काम न करता बिले सादर केल्याचा आरोप

लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

नागपूर रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला,तेलंगणा एक्सप्रेसमधील प्रवासी थोडक्यात बचावले

मालीमध्ये सोन्याची खाण कोसळल्याने 42 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

पुढील लेख
Show comments