Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरे देवा कोल्हापूर - सांगली येथे पुन्हा पूर स्थिती पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, ४२ बंधारे पाण्याखाली

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (16:33 IST)
नुकतेच महापुरातून सावरत असलेल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पुन्हा पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा नद्यांची पातळी वाढली असून, अनेक बंधारे बुडाले आहेत. तर गावांचा संपर्क देखील तुटला आहे. कोल्हापुरात येथे मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनही ओसरत नाहीये. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर गेली असून, 42 बंधारे पाण्याखाली गेले सोबतच  60 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
 
त्यामुळे या गावांची वाहतूक पर्यायी वळवली आहे, दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे.  राधानगरी धरणातून 8540 क्यूसेक, दूधगंगा 11900 क्यूसेक तर तुळशी धरणातून 1011 क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रशासन तयार झाले असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाने कळवले आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments