Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एस टी करणार मालवाहतूक सुरु सोबत पुरवणार गोदामे सुद्धा

Webdunia
शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:31 IST)
एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरू करणार आहे. सोबतच ते  गोदामांच्या व्यवसाय देखील करणार आहे. या नवीन उपक्रमात  महामंडळाचे उत्पन्न वाढविणे, त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कल्पक उपाययोजना सध्या राबविण्यात येत आहे. स्वतंत्र वाहनांद्वारे मालवाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर 301 गोदामांची निर्मिती  केली जाणर आहे असे  मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची मालवाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले आहे. महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद असून, आज पर्यंत दुर्लक्षित असलेल्या मालवाहतुकीच्या तरतुदीचा  वापर करण्याचा निर्णय मंत्री रावते यांनी घेतला आहे. रेल्वे मालवाहतुक जेसे होते त्याच धर्तीवर आता एसटीचीही मालवाहतूक सुरू  होणार आहे. या  मालवाहतुकीमुळे रेल्वे मोठ्या प्रमाणात फायद्यात आहे. मालवाहतूक सेवेसाठी स्वतंत्र वाहने वापरली जाणार आहेत.  सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांचे 9 वर्षांनंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण केले जाते.  त्यास परिवहन विभागाची रीतसर मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर ही वाहने मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहेत.  यामुळे कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक केली जाणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गडचिरोली : शाळेत विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्ये, पोलिसांनी मुख्यध्यापकाला केली अटक

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या योजना कधीही बंद केली जाणार नाही

पालघरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

पॅकेटमध्ये मेलेला उंदीर, मुलांच्या पोषण आहाराबाबत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला

LIVE: पालघरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक

पुढील लेख
Show comments