Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हा तर राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय आहे : संजय राऊत

Webdunia
शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (16:35 IST)
“महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यामुळे कोणीही काही बोलण्यापूर्वी भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना रणौतसोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही. परंतु महाराष्ट्राचा मुंबईचा अपमान सहन केला जाणार नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याचं कृत्य अत्यंत गंभीर आहे,” असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा त्यावर भाष्य केलं. महाराष्ट्राबद्दल कोणी असं गंभीर वक्तव्य करत असेल तर तो केवळ एखाद्या पक्षाचा विषय राहत नाही. तो राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय होत असल्याचे ते म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
 
“भाजपाच्या काही नेत्यांच्या भूमिकांबद्दलही वाचन केलं. आशिष शेलारही म्हणाले कंगना राणौत यांनी मुंबईला अक्कल शिकवण्याची गरज नाही. त्यांनी हे अधिक जोरात बोललं पाहिजे. महाराष्ट्र हा त्यांचाही आहे. तेदेखील महाराष्ट्रात राजकारण करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एकाचे नाही. ते महाराष्ट्राचे संपूर्ण देशाचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशाप्रकारे टीपण्णी करत असेल तर तो विषय एखाद्या पक्षाचा शिवसेनेचा राहत नाही. तो राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय आहे,” असंही राऊत म्हणाले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments