suvichar

लातूरकर दुष्काळाच्या लढ्यासाठी सरसावले ‘जलाग्रही लातूर’ चळवळ सुरु

Webdunia
सोमवार, 10 जून 2019 (16:42 IST)
सतत गंभीर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लातूर शहरात शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एकमात्र पर्याय असणाऱ्या उजनीचे पाणी मिळविण्यासाठी लातूरकर एकवटले आहेत. त्यांनी ‘जलाग्रही लातूर’ या सर्वसामान्य लातूरकरांनी उभारलेला राजकीय उपक्रम जोरदार पाठींबा मिळत आहे. विशेष म्हणजे कोणाचाही राजकीय चेहरा नसताना सामान्य लातूरकरांनी दाखवलेला सहभाग यामध्ये अभूतपूर्व आहे. उजनीचे पाणी लातूरला मिळावे याची निवेदन लातूरकरांच्या वतीने देशाचे पंतप्रधान, केंद्रीय जनशक्ती मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांना पाठवण्यात आले आहे. जलाग्रही लातूरच्या वतीने सामान्य लातूरकरांना एकत्रित करून उजनीच्या पाण्याकरिता आग्रही भूमिका घेण्यात येत असून, यामध्ये सर्वसामान्य लातूरकर सहभाग घेताना दिसून येत आहेत.
 
याच अनुषंगाने अष्टविनायक हॉल येथे पार पडलेल्या व्यापक बैठकीत आदोलानाची पुढील दिशा ठरविण्यात आली. केवळ घोषणा होईपर्यंत नव्हे तर ठोस कारवाई होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे. यासोबत  महानगरपालिकेच्या वतीने उजनीचे पाणी मिळविण्यासाठी ठराव घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच सर्वसामान्य लातूरकरांनी शक्य त्या मार्गाने केंद्र शासन व राज्य शासना पर्यंत आपली मागणी नोंदवून सकारात्मक दबाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Ajit Pawar plane crash अजित पवार यांच्या मृत्यूबाबत AAIB चा प्राथमिक अहवाल समोर आला

जळगाव : प्रियकराने घरात घुसून विवाहित प्रेयसीवर गोळी झाडली, नंतर आत्महत्या केली

धोकादायक रसायनांच्या वाहतुकीसाठी एसओपी तयार करणार, महामार्ग सुरक्षा कडक करणार-मुख्यमंत्री

LIVE: मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

इस्रायली हवाई हल्ल्यात प्रचंड कहर, इराणी शाळांमध्ये ५७ निष्पाप मुली ठार

पुढील लेख
Show comments