Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रसिद्ध तबला वादक भाई गायतोंडे यांचं निधन

Webdunia
ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांचं गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. ते ८७ वर्षाचे असून ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. दिलीप गायतोंडे, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत विश्वातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
 
ज्येष्ठ तबदलावादक पं. अहमदजान थिरकवा यांचे शेवटचे शिष्य अशी त्यांची ओळख होती. पंडित जगन्नाथबुवा पुरोहित अर्थात गुणीदास यांच्याकडे त्यांनी अनेक वर्ष तबलावदानाचे धडे गिरविले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ तबलावादक पंडित अहमदजान थिरकवा यांच्याकडेही त्यांनी तबला वादनाचे धडे घेतले होते. तबला वादन या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला.
 
पेशाने केमिकल इंजिनिअर असूनही तबलावादनाकडे त्यांचा कल अधिक होता. त्यांना क्रिकेटची आवड असलेल्या त्यांनी रणजी क्रिकेटमध्येही छाप पाडली होती. 
 
तबलावादन ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी देशातील अनेक विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यापीठांसह राहत्या घरीही त्यांनी सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना तबल्याचे निःशुल्क प्रशिक्षण दिले.
 
मात्र गुरूवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने ११.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments