Dharma Sangrah

मालाड येथील दुर्घटनेला जबाबदार कोण? आ. विद्या चव्हाण यांचा सवाल

Webdunia
रात्री झालेल्या मुसळधार पावसात मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून सुमारे १८ जण मृत्युमुखी पडले तर कित्येक जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. गेली २० वर्ष हा विभाग पालिकेच्या अखत्यारित येतो. मात्र, झोपड्पट्टीधारकांना कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पाणी पुरवठा, वीज, पक्की घरे यापासून येथील झोपडीधारक वंचित असल्याचे विद्या चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
 
मुंबई महानगरपालिकेने वेळीच नाले, गटारे यांची व्यवस्था केली असती तर आज अशी दुर्दैवी वेळ ओढवली नसती. वन विभाग आणि पालिका यांच्यातच ताळमेळ नसल्याने पावसाळ्याआधी हाती घेतलेली कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पालिकेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, एकीकडे मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्याची स्वप्ने दाखवतात आणि दुसरीकडे ६५ लाख झोपड्पट्टीधारक अशा भीषण परिस्थितीत जीव धोक्यात घेऊन राहात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुर्घटना बाधित झोपड्पट्टीधारकांना घरे उपलबध करून द्यावीत आणि त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध विजय मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान

LIVE: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

आदर्श नगरमधील इमारतीला आग, एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

वैभवच्या १० षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय

इराणमधील संकटामुळे, भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी एक सल्लागार जारी केला

पुढील लेख
Show comments