Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक-दोन अपवाद सोडले तर 40 पैकी एकही जण निवडून येणार नाही - शरद पवार

Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (08:40 IST)
शिवसेनेचे आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर या 40 आमदारांपैकी एकही जण निवडून येणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
 
शिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती एकत्र आल्यास चित्र वेगळं असेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
 
"सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगलं काम केल्याचं ठिकठिकाणी ऐकायला मिळतं. प्रदेशाध्यक्षांनी सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे," अशी सूचना शरद पवार यांनी केली.
 
शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यांवरही भाष्य केल्याचं  वृत्तात म्हटलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments