Festival Posters

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा आघाडीतून बाहेर

Webdunia
शेतकरी प्रश्नावर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने भाजपा आघाडीला आपला पाठींबा दिला होता. तर शेतकरी संप आणि शेतकरी प्रश्वाव्र सतत सत्तधारी भाजपला विचारणा करत होते. याच काळात राजू शेट्टी यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक वाढत होत. शेतकरी संप झाला मात्र सरकारने हवी तशी कर्जमाफी शेतकरी वर्गाला दिली नाही म्हणून शेट्टी नाराज होते. तर खोत मात्र सरकार योग्य निर्णय घेतय असे बोलत होते. सर्वजनिक ठिकाणी आता शेट्टी आणि खोत एकत्र दिसणे बंद झाले आणि त्यांनी एकमेकांनवर टीका करयला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की शेतकरी संघटनेने खोत यांना बाहेर काढेल होते. खोत यांना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कृषी राज्य मंत्री पद दिले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा पाठींबा काढून घेतला. तर राजू शेट्टी यांनी पुन्हा सरकारविरोधी भूमिका घेतली आणि आंदोलन सुरु केले आहे.यापुढे आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, आपण सर्वच पक्षांशी अंतर ठेवूनच राहू असेही शेट्टी यांनी जाहीर केले आहे.शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करणे आणि शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळणे या मुद्यांवर आता शेतकऱ्यांची चळवळ उभी करणार असल्याचेही शेट्टींनी जाहीर केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे स्थानकात प्रवेश करताना सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला

दक्षिण सूडान मध्ये विमान कोसळले, १४ जणांचा मृत्यू

अकोला: कार अपघातात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, गावकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

पुणे स्थानकावर सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे डबा रुळावरून घसरला

उकाड्यात दिलासा मिळण्यासाठी दुकानदाराने भटक्या कुत्र्यांसाठी दुकानाचे दरवाजे उघडले; व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments