Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद, सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात

Webdunia
गुरूवार, 25 मार्च 2021 (10:22 IST)
भारतात गेल्या २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही मागील 5 महिन्यात ही एका दिवसातील उच्चांक आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. 
 
आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात गुरुवारी २३ ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या २१ तासात भारतात ५३ हजार ४७६ नवे रुग्ण आढळले असूण २५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
 
भारतात सध्याच्या घडीला रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ आहे. तर १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३ लाख ९५ हजार १९२ इतकी आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ६९२ इतकी आहे. 
 
काळजीची बाब म्हणजे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे. देशभरात आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जानेवारीत मिळणार नाहीत

महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता थांबणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली

राज्यातील सर्व शाळा 5 दिवस बंद, सार्वजनिक सुट्टी जाहीर

LIVE: लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत राहिले असते तर त्यांना त्यांचे निवडणूक चिन्ह गमवावे लागले नसते रामदास आठवले यांचा दावा

पुढील लेख
Show comments