rashifal-2026

३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

Webdunia
शनिवार, 11 एप्रिल 2020 (15:30 IST)
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रोखण्यासाठी गरज आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत मागणी केली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळल्यामुळे लाॅकडाऊन वाढविण्याची विनंती, करण्यात आल्याची माहिती  सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
 
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबाबत संभ्रम आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या वाढत राहिली आणि लॉकडाऊन उठविण्यात आले तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची गरज आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली आहे. तशी आमची तयारी आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यांनीही लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपात33 जण जखमी, दोन फूट उंच त्सुनामीच्या लाटा आल्या

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगोच्या 200 हुन अधिक उड्डाणे रद्द, 10 विमानतळांवर अधिकारी तैनात

मोरया गोसावी संजीवन समाधी : मोरया गोसावी कोण होते?

वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित, कुटुंबांना देणार सरकारी नोकरी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments