Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळीच्या दिवशी पोळीचा हा उपाय बदलून देईल तुमचे भाग्य

Webdunia
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (22:32 IST)
तुम्ही बर्‍याच वेळा आपल्या मोठ्यांकडून हे ऐकले असेल की घरातील पहिली पोळी नेहमी वेगळी काढून ठेवायला पाहिजे. कोणी याला गायीला खाऊ घालतात तर कोणी कुत्र्याला. शास्त्रानुसार घरातील पहिली पोळी नेहमी वेगळी काढून ठेवायला पाहिजे.  
 
वेगळी काढलेल्या पोळीचे चार समान तुकडे करून ऐक तुकडा गायीला तर दुसरा काळ्या कुत्र्याला खाऊ घालायला पाहिजे. उरलेल्या दोन तुकड्यांपैकी एक कावळ्यासाठी तर दुसरा घराजवळच्या चौरस्त्यावर ठेवायला पाहिजे. आता तुम्ही विचार करत असाल कर सांगायचे म्हणजे या चारी गोष्टींचा संबंध पितरांशी जोडण्यात आला आहे. असे केल्याने पितृगण प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत करतात.  
 
शास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी, घरातील पहिली पोळी गायीला खाऊ घालायला पाहिजे. त्यानंतर घरातील बाकी सदस्यांसाठी पोळ्या बनवायला पाहिजे.  
 
हिंदू धर्मानुसार गायीला पूजनीय मानण्यात आले आहे. शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे की गायीमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास असतो. जेव्हा आम्ही दिवाळीच्या दिवशी पहिली पोळी गायीला खाऊ घालतो तेव्हा याचा अर्थ असा असतो की सर्व देवी देवतांना आम्ही पोळी खाऊ घातली आहे. असे केल्याने त्या व्यक्तीची सर्व इच्छा पूर्ण होते आणि घरात सुख समृद्धी येते. म्हणून दिवाळीच्या दिवशी घरातील पहिली पोळी गायीला जरूर खाऊ घालायला पाहिजे.    
 
दिवाळी शिवाय देखील पहिली पोळी वेगळी काढून ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घरात सतत वाद विवाद होत असतील तर शनिवारी पहिली पोळी एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायला पाहिजे. असे केल्याने कुटुंबात होणारे मतभेद दूर होतील आणि घरात सुख शांती राहील.  

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments