Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विकासाचा ढोल बडवला, त्या दाभडीचाही विकास नाही, ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्काराचा इशारा

Webdunia
शनिवार, 23 मार्च 2019 (17:37 IST)
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी #दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा बिगुल फुंकला होता. पाच वर्षांत या गावात नावालाही विकास झालेला नाही. इथले ग्रामस्थ भाजपाच्या भंपकगिरीला इतके वैतागले आहेत की त्यांनी कोणताही विकास न झाल्यामुळे थेट मतदानावर बहिष्काराचीच घोषणा केली आहे.
 
२०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी दाभडीमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात सॅटेलाईटद्वारे २३ राज्यांतील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला. भाजपाचे सरकार आल्यास अच्छेदिनयेतील असे आश्वासन त्यांना दिले. प्रत्यक्षात शेतकरी तर सोडाच, दाभडी गावालाही ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत. त्यामुळेच थेट मतदानावरच बहिष्कार घालण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
 
#दाभडी देवस्थान ते गाव जोडणारा पूल नादुरुस्त आहे. पाच वर्षांत त्याची साधी दुरुस्तीही होऊ शकलेली नाही, हा गावकऱ्यांच्या रोषाचा प्रमुख मुद्दा आहे. या पुलाबाबत चंद्रपूरचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यामार्फत प्रयत्न करण्यात आले. पाठपुरावाही झाला, पण कशाचाच उपयोग झाला नाही. त्यामुळे बहिष्काराचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. देशभरातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अशी संतापाची लाट आहे. तरीही सारंकाही नीटनेटकं असल्याचा आव मोदी आणि भाजपाकडून आणला जातो आहे. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस ने सोशल मिडीयावर केली आहे. 

संबंधित माहिती

Russia-ukraine war : युक्रेनच्या हवाई दलाचा दावा- खार्किवमध्ये 29 पैकी 28 रशियन ड्रोन पाडले

भालाफेकमध्ये सुमित अंतिल पुन्हा विश्वविजेता

Badminton Ranking: सात्विक-चिराग जोडी जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

या खेळाडूने व्यक्त केली मुख्य प्रशिक्षक बनण्याची इच्छा म्हणाले -

Pune Hit and Run Case : राज्य शुल्क विभागाकडून पुण्यातील कोझी बार आणि ब्लॅक पब सील

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुढील लेख
Show comments