Marathi Biodata Maker

देशाचे राज्य चालवायचे असेल तर प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे, प्रधानमंत्री यांच्या कडे टीम नाही - शरद पवार

Webdunia
शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (10:33 IST)
नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते.ते म्हणाले, देशाचे राज्य चालवायचे असेल तर प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. ते समजावून घेतले पाहिजेत. मात्र प्रश्‍न समजावून घेणारी टीम पंतप्रधानांकडे नाही.रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या सभेत सर्व रंगांचे कपडे घालणार्‍यांना प्रवेश असतो. मोदी साहेब हे फक्त शरद पवार यांच्यावरच बोलतात. पवार हेच सर्व पक्षांना एकत्रित करू शकतात. म्हणून मोदी यांना शरद पवार यांची भीती वाटत असावी. कर्जमाफी दिली म्हणजे उपकार केल्यासारखे ते बोलत आहेत. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा कोणालाही लाभ झाला नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना सरसकट कर्जमाफी दिली गेली.निवडणुकीच्या आधी काही दिवस सरकारने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. भाजपाचा कार्यकर्ता असेल तिथेच पालकमंत्र्यांनी छावण्या दिल्या, असा आरोप त्यांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

अमरावतीत चिकनच्या तुकड्या वरून मोठ्या भावाने केली लहान भावाची निर्घृण हत्या

LIVE: एमएससी बँक घोटाळ्यात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

राष्ट्रीय विज्ञान दिन कधी आणि का साजरा केला जातो?

रस्ते अपघातांमुळे देशाच्या जीडीपीला ३% फटका; नितीन गडकरींनी मांडली धक्कादायक आकडेवारी

नवीन सिम-बाइंडिंग नियमामुळे व्हाट्सअॅप आणि टेलिग्रामअॅप्स आपोआप बंद होणार? नवीन अपडेट जाणून घ्या

पुढील लेख
Show comments