Marathi Biodata Maker

एसबीआयने नोटबंदीचा ओव्हरटाईम परत मागितला

Webdunia
मंगळवार, 17 जुलै 2018 (17:08 IST)
नोटबंदी काळात देशातील सर्वच सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम केला. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या 70 हजार कर्मचाऱ्यांकडे ओव्हरटाईमसाठी देण्यात आलेल्या पैशांची रक्कम परत मागितली आहे. ज्या पाच बँकांचे एसबीआयमध्ये विलिनीकरण करण्यात आले, त्या पाच बँकांचे हे सर्व कर्मचारी आहेत. विशेष म्हणेज या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमाची रक्कम मिळून 1 वर्षापेक्षाही जास्त काळ लोटला आहे.
 
एसबीआयकडून ज्यावेळी कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमसाठी निर्णय घेण्यात आला. त्यावेळी, या बँकांचे विलिनीकरण झाले नव्हते, असे एसबीआयने म्हटले आहे. नोटबंदीवेळी जे कर्मचारी एसबीआय शाखांमध्ये कार्यरत होते, केवळ त्यांनाच या ओव्हरटाईमचा मोबदला देण्यात येणार होता, असे ठरल्याचे एसबीआयने म्हटले आहे. दरम्यान, नोटबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेण्यात आला होता. तर स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपूर या बँकांचे 1 एप्रिल 2017 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात विलिनीकरण करण्यात आले आहे.
 
एसबीआयने 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीत सायंकाळी 7 वाजल्यानंतरही काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार मे 2017 च्या दरम्यान ओव्हरटाईमचा मोबदला दिला होता. मात्र, आता संलग्नित बँकांच्या कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम परत मागविण्यात येत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments