Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईचा विहार तलाव भरून वाहू लागला

Webdunia
सोमवार, 19 जुलै 2021 (08:09 IST)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक मात्र लहान असलेला विहार तलाव १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे.तत्पूर्वी, तुळशी तलाव हा १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता, पवई तलाव १२ जून रोजी दुपारी ३ वाजता भरून वाहू लागला होता. आता विहार तलावही भरून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब सुखावह ठरली आहे. गेल्यावर्षी ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास विहार तलाव पूर्ण भरून वाहू लागला होता. २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी तर २०१८ मध्‍ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.
 
विहार तलावाची पाणी साठवण क्षमता २७,६९८ दशलक्ष लीटर इतकी आहे.मुंबईला मुंबईबाहेरील प्रमुख पाच तलाव आणि मुंबईतील तुळशी व विहार या दोन तलावांमधून अशा एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लीटर इतक्या पाण्याचा पुरवठा केला जातो. विहार तलावातून मुंबईला दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments