Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चाळीसगाव अपडेट : दोघांचा मृत्यू, शेकडो गुरे वाहिली

chalisgaon-rain-update-2-person-died
Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (23:28 IST)
चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना पूर आला असून वाकडी गावातील ६३ वर्षीय वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाला आहे तर पिंपरखेड परिसरात नदीच्या पुरात एक अनोळखी मृतदेह सापडला आहे. तसेच शेकडो गुरे पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
चाळीसगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी, नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून चाळीसगाव शहरासह आजूबाजूच्या वाकडी, रोकडे, वाघडू, वाघळी, खिर्डे, लोंजे, जांभळी, मुंदखेडे, रहिपुरीसह १५ गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
 
तालुक्यातील वाकडी गावातील वृद्धा कलाबाई पांचाळ (वय ६३) यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पिंपरखेड या गावी पुराच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहून आला असून, त्याची ओळख पटलेली नाही.
 
चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरामुळे शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच कन्नड घाटात देखील एका वाहनावर दरड कोसळल्याने त्यात असलेल्या म्हशी दगावल्याचे समजते.
 
तालुक्यातील काही गावांमध्ये लोक अडकले असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. या पथकात ३५ जणांचा समावेश असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी दिली आहे. स्थानिक तरुण, सामाजिक मंडळांचे कार्यकर्ते मदतकार्यात जुंपले असून लोकप्रतिनिधी ठेवून आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा केली

काँग्रेस नेत्यांना पाकिस्तानला पाठवा...,पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर संजय निरुपम संतापले

नागपूर : दोन वाघांमध्ये झालेल्या भीषण लढाईत एका वाघाचा मृत्यू

५ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या, हातपाय तोडून मृतदेह शेतात फेकून दिला

विरोधी नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून निषेध

पुढील लेख
Show comments