Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पक्षात दोन गट पडणे, संघर्ष होणे हे महाराष्ट्राला नवीन नाही पण संघर्षालाही मर्यादा असावी; शरद पवार

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (08:38 IST)
पक्षात दोन गट पडणे, संघर्ष होणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. पण संघर्षालाही मर्यादा ठेवली पाहिजे. सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरू आहे ते दुर्देवी आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी एकमेकांवर टीका करताना मर्यादा ओलांडू नये, ते राज्याच्या दृष्टीने चांगले होणार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन्ही गटाचे कान टोचले.
 
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, शिंदे व ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आणि खरा पक्ष कोणता यावरुन त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेच्या निकालाची सूत्रे एकप्रकारे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारली गेली आहेत. संघर्षालाही मर्यादा असतात. दोन्ही गटाने या मर्यादा पाळाव्यात. सध्या दसरा मेळाव्यावरुन राज्यात सुरू असलेलं राजकारण दुर्देवी आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments