Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भर दुष्काळात लातूरच्या त्या विहिरीकडे दुर्लक्ष, भागवली होती ७२ सालात तहान

Webdunia
बुधवार, 29 मे 2019 (18:03 IST)
फाईल फोटो
प्रशासन जागे नसेल तर कश्या प्रकारे अडचणी वाढतात याचा उत्तम नमुना दुष्काळी लातूरमध्ये पहायला मिळतो आहे. ही बातमी आहे एका विहरीची जी शहरातील मध्यभागी असून भर उन्हात त्यात चक्क पाणी आहे. मात्र या विहरीकडे मनापा आणि त्या भागातील नगरसेवकाने इतके दुर्लक्ष केले आहे कि त्या विहारीतील पाणी खराब झाले आहे. 
 
लातूर शहरातील गोरक्षणच्या १०५ फुटी ऐतिहासिक विहिरीत ७० ते ७५ फूट पाणी अजूनही दिसते आहे. जर येथून पाणी उपसल तर पुन्हा विहीर परत भरते,  या विहिरीनं १९७२ च्या दुष्काळात लातुरकरांची तहान भागवली होती, मात्र  नंतर विहिरीचा उपयोग फक्त गणपती विसर्जनासाठी करण्यात आला होता. परत जेव्हा २०१६ मध्ये भीषण पाणी टंचाई आली तेव्हा सुकाणू समितीनं प्रशासनाच्या मागे लागून या विहिरीचं खोलीकरण करुन घेतलं, गाळ काढून घेतला. मग या विहिरीतून गोरक्षणवासियांना पाणी मिळालं होते. रोज २० ते २५ टॅंकर शहरासाठी जाऊ लागले. पुन्हा पाऊस झाला अन सगळे या विह्ररीला पुन्हा विसरुन गेले होते. मग नंतर मनपाने वीज पुरवठा बंद केला. सोबतच पाणी काढायची मोटारही काढून नेली.
 
मात्र आज दुष्काळी स्थितीत या विहिरीत मुबलक पाणी आहे. मात्र शहरात बाहेरुन पाणी आणले जाते. पण शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या जीवंत आणि खात्रीच्या स्रोताकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. या भागातले नगरसेवकही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. निवडणुकीपुरते येतात पुन्हा तोंडही दाखवत नाहीत असा आरोप या भागातील नागरिक करतात. त्यामुळे आता या विहिरीची योग्य काळजी घेतली आणि तिला स्वच्छ केले तर त्या भागातील नागरिकांचे काही प्रमाणात तहान भागवली जाऊ शकते.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments