Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भर दुष्काळात लातूरच्या त्या विहिरीकडे दुर्लक्ष, भागवली होती ७२ सालात तहान

भर दुष्काळात लातूरच्या त्या विहिरीकडे दुर्लक्ष  भागवली होती ७२ सालात तहान
Webdunia
बुधवार, 29 मे 2019 (18:03 IST)
फाईल फोटो
प्रशासन जागे नसेल तर कश्या प्रकारे अडचणी वाढतात याचा उत्तम नमुना दुष्काळी लातूरमध्ये पहायला मिळतो आहे. ही बातमी आहे एका विहरीची जी शहरातील मध्यभागी असून भर उन्हात त्यात चक्क पाणी आहे. मात्र या विहरीकडे मनापा आणि त्या भागातील नगरसेवकाने इतके दुर्लक्ष केले आहे कि त्या विहारीतील पाणी खराब झाले आहे. 
 
लातूर शहरातील गोरक्षणच्या १०५ फुटी ऐतिहासिक विहिरीत ७० ते ७५ फूट पाणी अजूनही दिसते आहे. जर येथून पाणी उपसल तर पुन्हा विहीर परत भरते,  या विहिरीनं १९७२ च्या दुष्काळात लातुरकरांची तहान भागवली होती, मात्र  नंतर विहिरीचा उपयोग फक्त गणपती विसर्जनासाठी करण्यात आला होता. परत जेव्हा २०१६ मध्ये भीषण पाणी टंचाई आली तेव्हा सुकाणू समितीनं प्रशासनाच्या मागे लागून या विहिरीचं खोलीकरण करुन घेतलं, गाळ काढून घेतला. मग या विहिरीतून गोरक्षणवासियांना पाणी मिळालं होते. रोज २० ते २५ टॅंकर शहरासाठी जाऊ लागले. पुन्हा पाऊस झाला अन सगळे या विह्ररीला पुन्हा विसरुन गेले होते. मग नंतर मनपाने वीज पुरवठा बंद केला. सोबतच पाणी काढायची मोटारही काढून नेली.
 
मात्र आज दुष्काळी स्थितीत या विहिरीत मुबलक पाणी आहे. मात्र शहरात बाहेरुन पाणी आणले जाते. पण शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या जीवंत आणि खात्रीच्या स्रोताकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. या भागातले नगरसेवकही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. निवडणुकीपुरते येतात पुन्हा तोंडही दाखवत नाहीत असा आरोप या भागातील नागरिक करतात. त्यामुळे आता या विहिरीची योग्य काळजी घेतली आणि तिला स्वच्छ केले तर त्या भागातील नागरिकांचे काही प्रमाणात तहान भागवली जाऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments