Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तकऱ्यांच्या लेकींचे आंदोलन सरकारला हद्दपार करणार - जयंत पाटील

Webdunia
शेतकरी संपाचे गाव म्हणून महाराष्ट्रातील पुणतांबा ओळखले जाते. पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेकींनी चार दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या लेकींचे हे आंदोलन सरकारला सत्तात्याग करायला भाग पाडेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

बुधवारी, तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. तर शालेय विद्यार्थीनींनी काळे झेंडे हाती घेऊन सरकाविरोधी निषेध रॅली काढली. राज्यभरातून महिला आणि शेतकरी या मुलींना पाठिंबा देण्यासाठी पुणतांबा येथे दाखल होऊ लागले आहेत. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पुणतांब्यात येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दीड वर्षांपूर्वी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी पुणतांब्याच्या शुभांगी, पूनम आणि निकिता जाधव यांनी सरकारविरोधात हा एल्गार पुकारला आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. तीन दिवसानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला या आंदोलनाची दखल घेण्यास वेळ मिळालेला नाही.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments