Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

8 ऑक्टोबरला मुंबईमधून मान्सून निरोप घेणार, हवामान विभागाची माहिती

Webdunia
शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (21:07 IST)
मान्सूनबाबत हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर  8 ऑक्टोबरला मुंबईमधून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, 26 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. परतीच्या प्रवासात उत्तर मान्सून सक्रिय झाला आहे.
 
देशात जून महिन्यामध्ये पावसाने उघडीप दिली होती. परंतु, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील देशात पावसाने हजेरी लावली होती. देशातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
 
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. देशातील २४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 1 जूनपासून देशात सर्वच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments