Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोलीत सामूहिक आत्महत्या, मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:26 IST)
मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने नाराज कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत घडला. एकाच कुटुंबातील तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
 
विवेकानंदनगर येथे 24 वर्षीय मुलीने अन्य जातीतील मुलाशी लग्न केल्याच्या रागातून आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली. रवींद्र नागोराव वरगंटीवार (50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (43) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (19) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. 
 
रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीने अन्य जातीच्या मुलासोबत प्रेम विवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, घरच्यांनी नकार दिला. परंतू प्रेमविवाह करण्यासाठी मुलगी घरातून पळून गेली. नंतर तिने मंदिरात विवाह केल्याचं समजलं. या प्रकाराने वरगंटीवार कुटुंबाने तणावात येऊन टोकाचं पाऊल उचललं.
 
कुटुंबातील तिघांनीही विवेकानंद नगर परिसरातील विहिरीत उड्या घेऊन आत्महत्या केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

पुढील लेख
Show comments