Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले

Webdunia
शनिवार, 19 जानेवारी 2019 (16:34 IST)
गेल्या ९ महिन्यात एकट्या मेळघाटात ५०८ बालके मृत्यूमुखी पडली आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१८ दरम्यान कुपोषणामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील ११ आदिवासी भागांमधील कुपोषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी न्यायालयात याचिकाकर्त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यावरुन न्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले असून अद्याप यावर का उत्तर देण्यात आलेले नाही असा सवाल केला आहे.
 
मेळघाटात डॉक्टरांना या भागात जाऊन काम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप एकही डॉक्टर तेथे गेलेले नसून याविषयीचे अहवाल सादर करण्यात आले आहेत. तसेच ‘मुलांचे मृत्यू कशाने होत आहेत याचे कारण शोधून काढण्यासाठी काहीही केले जात नाही’, असे मेळघाटामधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठाला सांगितले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments