Marathi Biodata Maker

परप्रांतीय मुद्दा राज विरुद्ध नाना आणि मुख्यमंत्री

Webdunia
गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (15:03 IST)
परप्रांतीय मुद्दा पुन्हा एकदा गाजत असून आता राज  यांच्या   विरोधात  आता नाना पाटेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परप्रांतीय लोकांची पाठराखण  केली  आहे . त्यामुळे आता मनसे विरोधात  नाना आणि मुख्यमंत्री असा वाद पहायला मिळत आहे.
काय म्हणाला नाना पाटेकर :
हे नुकसान गरिबांचे झाले आहे. मनसेचे फक्त एक वोट गेले मात्र अनेकाचा रोजगार गेला,   ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे. मला काल कोणीतरी विचारलं की, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरुन हुसकावून लावणं, मारणं योग्य आहे का ? माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यांना भाकरी कमवायचा अधिकार आहे,
 
मुख्यमंत्री देवेद्ब्र फडणवीस :
उत्तर भारतीय आणि अन्य राज्यातून येणा-या लोकांनी  महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतीयांनी आपले योगदान देऊन मुंबईला महान बनवले,  त्यांनी मुंबईला मोठे बनवले आहे.भाषा वादाचा विषय असू शकत नाही. भाषा संपर्काचं माध्यम असून भाषा माणसाला जोडते. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद निर्माण करु नये असे वक्तव्य आता मुख्यमंत्री यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
 
राज ठाकरे यांचे उत्तर 
मुंबई आणि महाराष्ट्र यापूर्वीही महान होता, आहे आणि राहील. महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी आश्रित म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांची गरज नाही त्यामुळे जेथून आले तेथे परत आज हा   एकाच मार्ग आहे असे मात्र मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.  मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं हास्यास्पद आहे. परप्रांतातील लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्या राज्यात विकास न झाल्यामुळं ते येतात. आश्रित म्हणून येणारे हे लोक मुंबई, महाराष्ट्राला महान कसं बनवू शकतात, असे देसाई यांनी  प्रश्न उपस्थित केले आहे. 
 
या सर्व प्रकारामुळे आता काही काळ तरी परप्रांतीय मुद्दा तरी गाजणार आहे हे उघड झाले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा: कर्जमाफीची तारीख जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक; १५ ऑगस्टपर्यंत मुदत, अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई होणार

विदर्भात पारा ४६°C च्या पार, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी

GT vs CSK : आयपीएल २०२६ च्या ६६ व्या सामन्यात चेन्नई आज गुजरातचा सामना करणार

पुढील लेख
Show comments