rashifal-2026

राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

Webdunia
मंगळवार, 16 जुलै 2024 (09:31 IST)
राज्यात पावसाने झडी लावली आहे. सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान विभागाने आज रायगडासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

तसेच  मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातार आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.आज मंगळवारी अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. या बाबत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सध्या राज्यात अतिवृष्टी नंतर नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना बाहेर काढले जात आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कोंड, आंबेड-डिंगणी-कार्जुवे, धामणी, कसबा या भागातील फणसवणे भागात पाणी तुंबले आहे, त्यामुळे या भागांमधील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्वांना सतर्क करण्यात आले आहे.
अति पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहत आहे. धरणे भरले आहे. आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 

रायगड जिल्ह्यत अति मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी रेड अलर्ट जारी केले आहे. किनारपट्टीवरील उर्वरित जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
मराठवाडा तसेच विदर्भ जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच  उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. 

Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

IND W vs SL W: श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा, मंधाना सह दोन नवीन चेहऱ्यांना संधी

LIVE: राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

लाडक्या बहिणीचा वारंवार उल्लेख करू नका, तुम्हाला घरीच राहावे लागेल म्हणत फडणवीस संतापले

इंडोनेशियातील जकार्ता येथील सात मजली कार्यालयाच्या इमारतीत भीषण आग, 20 जणांचा मृत्यू

दहिसरमध्ये एका तरुणावर तलवार आणि चाकूने हल्ला, गुन्हा दाखल, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments