Festival Posters

सोनई हत्याकांड करवणारया राक्षसाना फाशी द्या - उज्ज्वल निकम

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2018 (15:15 IST)
पूर्ण राज्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला हलवणारया अश्या  सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय आता 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. नाशिक जिल्हा विशेष न्यायालयात या केसचा  आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. तर हा गुन्हा इतका गंभीर आहे की त्याला दुर्मिळ असा समजून आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली आहे.
 
नगर येथे 1 जानेवारी 2013 रोजी  सोनई या गावात  उच्च जातीच्या मुली सोबत प्रेमप्रकरणातून 3 जणांची निघृत  हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वीच्या सुनावणीत एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना दोषी ठरवलं आहे. यामध्ये प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांच्यावरील दोष सिद्ध झाले होते. तर आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला. या सर्वांनी मिळून दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) या तिघांची हत्या केली होती.
 
सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणतात की, आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे अत्यंत क्रूर असून त्यांनी हे सर्व फार  थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले आहेत.  हे सर्व प्रकरण इतके भयानक आहे की आरोपींनी नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड केले आहे. त्यांनी  प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून केला आहे.  हे सर्व पाहून तर  रामायणतील राक्षसांची आठवण व्हावी. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं आहे.पद्धतीने तुकडे करून मर्डर केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे. तर त्या मुलीचा बाप ६० वर्षाचा होता तर त्याला हे कृत्य केल्यावर परिणाम काय होईल याची जाणीव होती त्याने हे सर्व घडवून आणले आहे. त्यामुळे या सर्वाना फाशीच झाली पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील मदरशाजवळ दहशतवादी स्फोट, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

मुंबई कोर्टाने पोलिसांना गँगस्टर कुमार पिल्लईला हाँगकाँगला पाठवण्याचे आदेश दिले

LIVE: नाशिकमधील 18 हजार जन्म दाखले संशयास्पद

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली

शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन

पुढील लेख
Show comments