उत्तराखंडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की राहुल गांधी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होते. आम्ही कधी हा पुरावा मागितला का की तुम्ही कोणत्या बापाचेे आहात? जर सैनिकांनी स्ट्राइक केल्याचे सांगितले तर मग तुम्हाला कोणी दिले पुरावा मागण्याचा अधिकार?
मुख्यमंत्री म्हणाले की या लोकांची मानसिकता बघा. बिपिन रावत हे उत्तराखंड आणि देशाची शान होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले तेव्हा राहुल गांधींनी त्याचे पुरावे मागितले.
ते म्हणाले की तुम्ही खरोखर राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही, याचा पुरावा आम्ही तुमच्याकडून कधी मागितला आहे? सैनिकांचा अपमान करू नका. देश ही खूप वरची गोष्ट आहे. लोक व्यक्तीसाठी नाही तर देशासाठी जगतात आणि मरतात.