suvichar

राज्यात १२ हजार २५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण

Webdunia
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (10:03 IST)
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असले तरी येथील रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. पण वाढता मृत्यूदर राज्यातील अद्याप चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार २५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३८ हजार ७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. 
 
दिवसभरात राज्यातील १७ हजार २५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्याचा रिकव्हरी रेट ८०.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ७२ लाख ४१ हजार ३७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ६५ हजार ९११ (२०.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ३८ हजार ३५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात २ लाख ४७ हजार ०२३ Active रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

'मातोश्री'वरून थेट देवेंद्र फडणवीसांना फोन? भाजप आणि ठाकरे गटातील जवळीकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

World Hunger Day 2026 जागतिक भूक दिन का साजरा करतो? इतिहास आणि महत्तव जाणून घ्या

प्रसिद्ध रिलस्टारने स्वतःच्या हॉटेल च्या स्वयंपाकघरात गळफास घेऊन जीवन संपवले

दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना बंदी केल्याने शिंदे आणि ठाकरे गट एकत्र मैदानावर; आंदोलन तीव्र

LIVE: मनोज जरांगे पाटलांची नवी घोषणा: "३० मे पासून रखरखत्या उन्हात बेमुदत उपोषण!"

पुढील लेख
Show comments