Festival Posters

३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

Webdunia
शनिवार, 11 एप्रिल 2020 (15:30 IST)
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रोखण्यासाठी गरज आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत मागणी केली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळल्यामुळे लाॅकडाऊन वाढविण्याची विनंती, करण्यात आल्याची माहिती  सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
 
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबाबत संभ्रम आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या वाढत राहिली आणि लॉकडाऊन उठविण्यात आले तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची गरज आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली आहे. तशी आमची तयारी आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यांनीही लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

Women's Asia Cup Rising Stars भारताने श्रीलंकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र सरकारच्या मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी

LIVE: मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले

१५ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून ५ दिवस जंगलात बंदी बनवून केला सामूहिक लैंगिक अत्याचार; अहिल्यानगर मधील घटना

दारू पिण्यापूर्वी जमिनीवर थेंब का शिंपडतात? जाणून घ्या त्यामागचे कारण

पुढील लेख
Show comments