Festival Posters

मोबाईल कंपन्याचा तुम्हाला त्रास तुम्ही करा या प्रकारे ट्राय कडे तक्रार

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (16:08 IST)
सध्या मोबाईलवरील कॉल ड्रॉपची समस्या अनेकांच्वाया डोक्ढयाला ताप बनली आहे. अनेकदा दिवसभरात दोन-चार कॉल ड्रॉप होतात. देशभरात असलेल्या अनेक नेटवर्कची ही समस्या असून, कॉल ड्रॉप झाल्यानंतर आपण पुन्हा एक दोनवेळा कॉल करुन, संभाषण संपवतो. मात्र आपण तक्रार करायच्या भानगडीत पडत नाही. आता मात्र टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ने अशा समस्यांचं निराकरण करण्यासाठी अनेक अॅप उपलब्ध करुन दिली. कॉल ड्रॉप, केबल किंवा टीव्हीला मिळणारं नेटवर्क या सर्वांच्या तक्रारी तुम्ही येथे करु शकणार आहात. ट्रायचे माय कॉल अॅप (TRAI MyCall) आहे, त्यावरुन तुम्ही तक्रार करु शकता. TRAI कडे तक्रार कशी करायची? तर तुम्ही सर्वात आगोदर  MyCall app हे अद्ययावत अॅप डाऊनलोड करायचे आहे. हे डाऊनलोड केल्यानंतर अॅप आवश्यक परवानगी मागेल, जसे कॉन्टॅक्ट, कॉल हिस्ट्री, मेसेज, लोकेशन वगैरे ती द्यायची गरज आहे. तुमच्या फोनवरुन एखाद्याला कॉल करा किंवा एखाद्याला तुमच्या नंबरवर कॉल करायला सांगा आणि कॉल जसा कट किंवा डिस्कनेक्ट होईल, तेव्हा एक पॉप-अप विंडो तुम्सहाला दिसणार आहे. तिथे तुम्हा कॉलला रेटिंग देण्याबाबत विचारना होणार आहे. तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार संबंधित कॉलला तुम्ही रेटिंग द्यायचे आहे. जर तुमचा कॉल ड्रॉप झाला असेल, तर कॉल ड्रॉप बटणावर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर सबमिट बटण दाबा, तुमच्या समस्येची नोंद होईल. यामुळे तुमची तक्रार न ऐकणारा तुमच्या ऑपरेटरला ट्राय ही समस्या दूर करायला सांगेल सोबतच ती दूर झाली नाही तर दंड देखील देणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जळगाव प्रेमप्रकरण रक्तरंजित! १२ वर्षांच्या संसाराला गोळीचा शेवट

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

भांडुपमध्ये ८वीच्या मुलांनी मित्राला संपवलं! तलावात फेकला मृतदेह

उन्नावमध्ये एक्सप्रेसवेवर उभ्या असलेल्या ट्रकला रोडवेज बसची धडक, तीन प्रवाशांचा मृत्यू, ३१ जण जखमी

दिल्लीत बॉम्बची धमकी: तीन बँका आणि सहा शाळा उडवण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

पुढील लेख
Show comments