Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील 'या' बँकेवर RBI कडून निर्बंध, फक्त 10,000 काढता येणार

Webdunia
गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (14:51 IST)
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील मलकापूर नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांवर विविध निर्बंध लादले आहेत. झर्व्ह बँकेने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. 
 
या सहकारी बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले असून आता मलकापूर नागरी सहकारी बँक कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करणार नाही. कोणतीही गुंतवणूक करणार नाही. कोणतेही दायित्व घेणार नाही आणि आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही पेमेंट करणार नाही.
 
ग्राहकांना खात्यातून फक्त 10,000 काढता येणार
मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना आता खात्यातून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, असे आरबीआयने म्हटलेय. बचत आणि चालू खाते अशा दोन्ही ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 
 
निर्बंध 24 नोव्हेंबरपासून सहा महिन्याकरिता लागू
नवे निर्बंध 24 नोव्हेंबरपासून सहा महिन्याकरिता लागू राहतील. सहकारी बँकांना सूचना जारी करणे म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये, अस आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील.
 
या दोन कंपन्यांवरही कारवाई
यासोबत रिझर्व्ह बँकेनं रेग्युलेशनशी निगडित नियमाचं पालन न केल्यामुळे टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड आणि एपनिट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली. या दोन कंपन्यांवर आरबीआयने दंड ठोठावल्याची बातमी आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments