Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कडाक्याच्या उन्हात आता चक्रीवादळाचे संकट; हवामान विभागाने दिला हा इशारा

Webdunia
शनिवार, 7 मे 2022 (08:06 IST)
संपूर्ण भारतात उन्हाची तीव्र लाट सुरू असतानाच आता चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. तशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळेच दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

हा कमी दाबाचा पट्टा उत्तर पूर्व दिशेने सरकत आहे. हा कमी दाबाचा पट्टा ७ मे ला सायंकाळी दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीत आणि ८ मे रोजी सायंकाळपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्य बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाचे स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे.यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून यासंदर्भात वेळोवेळी अंदाज दिले जाणार आहेत. त्याकडे नागरिकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

पुढील लेख
Show comments