Marathi Biodata Maker

कडाक्याच्या उन्हात आता चक्रीवादळाचे संकट; हवामान विभागाने दिला हा इशारा

Webdunia
शनिवार, 7 मे 2022 (08:06 IST)
संपूर्ण भारतात उन्हाची तीव्र लाट सुरू असतानाच आता चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. तशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळेच दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

हा कमी दाबाचा पट्टा उत्तर पूर्व दिशेने सरकत आहे. हा कमी दाबाचा पट्टा ७ मे ला सायंकाळी दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीत आणि ८ मे रोजी सायंकाळपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्य बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाचे स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे.यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून यासंदर्भात वेळोवेळी अंदाज दिले जाणार आहेत. त्याकडे नागरिकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments