rashifal-2026

पुढच्या 2 दिवसात राज्यभरात गारपिटीची शक्यता; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Webdunia
मंगळवार, 4 मे 2021 (08:14 IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही ठिकाणी तर अवकाळी पावसासह गारपिटही झाल्याचं पाहायला मिळालं.
 
येणाऱ्या दोन दिवसात राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हवामान विभागाने इशारा दिला आहे. काढणीला आलेल्या पिकांचं रक्षण करावं असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं आहे. पावसामुळे काढणीला आलेला शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात पावसामुळे खराब झाला. शहरी भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
 
अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडून लोकांचा मृत्यू झाला तर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे हवामान विभागातर्फे शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी ताडपत्री अथवा प्लास्टिकचं आवरण काढणीला आलेल्या पिकांवर टाकावं अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

पॅट कमिन्सने 6 महिन्यांनंतर शानदार पुनरागमन केले, 3 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला मागे टाकले

LIVE: दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत मोठा बदल

भाजपने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ऑपरेशन सिंदूरवरील विधान देशविरोधी म्हटले

राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी आमदारपदाचा राजीनामा देत भाजप मध्ये प्रवेश केला

टेनिस जगातील अल्काराज-फेरेरो जोडी विभक्त झाली, सात वर्षांची भागीदारी संपुष्टात आली

पुढील लेख
Show comments